पुणे : ‘वृक्षांमुळे मानवी जीवन आरोग्यदायी बनते. प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार देणारा विभाग आहे,’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात बोलत होते.
या वेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांना तंबाखूमुक्त अभियानाअंतर्गत तंबाखूजन्य पदार्थ खाणार नाही अशी शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. रंजना जाधव यांनी केले. या वेळी डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. ऋषिकेश खोडदे यांच्यासह प्राध्यापकवर्ग व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. डॉ. बाळासाहेब देवकाते यांनी आभार मानले.